'' ओझ ''
स्कूल व्हन चा
होर्न वाजला तसा शालिनीच्या
कामाचा वेग आणखीनच वाढला.दिवसभर शांत शांत असलेला घर सोहमच्या धडाकेबाज एन्ट्री ने
मोहरून गेला. सोहम ने पायातील श्युज आणि सॉक्स चारही दिशेला भिरकावले. स्कूल
ब्यग एका सोफ्यावर तर तलवारी सारखी water bag भिरकावत पूर्ण स्वयंपाकघरावर कब्जा मिळवून
शालिनी ला घट्ट मिठी मारली.
''मम्मा मम्मा आज
स्कूल मध्ये आम्ही खूप धमाल केली .''
''ओके डीअर,चल पटकन हात पाय धून घे तुझ्या साठी मस्त तुझे आवडते sandwich बनवलेत. आधी खावून घे आणि मग मला सगळ्या गमती जमती सांग.''
''वॉव यम्मी ,मम्मा यु आर ग्रेट.''
मस्त sandwhich
वर ताव मारून सोहम खेळायला गेला तशी शालिनी परत
रात्री च्या जेवणाच्या तय्यारी ला लागली. दिवसभर च्या ह्या संसारच्या रहाटगाडग्यात शालिनी पूर्णपणे पिसून निघत होती.
घराबरोबर आपल्या नवरा आणि मुलांचा स्टेटस च हे ओझा पेलवता पेलवता बिचारीचा स्वतःचा
आयुष्य आहे हे विसरूनच गेली होती.
दूर गावाच्या
शिवारावर डोक्यावर गवताचे भारे घेऊन संगी अल्की आणि सुभ्या वेगाने बाजाराच्या
दिशेने झपझप पावलं टाकत निघाले.
सुभ्या ,''
आये लई कळ लागली पाठीला कधी येणार बाजार मला
भूक बी लागलीया...''
संगी,'' सुभ्या थोडी कळ सोस पोरा बघ ती अल्की बी उपाशी
हाये ती कशी गपगुमान चालली बघ,लवकर गवत इकला कि
तुला खायला घेईल काहीबाही .चाल भराभरा बाजार संपायच्या आत जावा लागल .''
तिघांची अनवाणी
पावलं बाजाराच्या दिशेने जोरात निघाली तोच बुलेट च्या धूड धूड आवाजाने तिच्या हृदयाची धड धड वाढवली. संगीच्या मनातील शंका खरी ठरली जमीनदाराचा तात्या बुलेट चा
वेग कमी करून संगी ला आडवा उभा राहिला .कधी अल्की कधी संगीला न्याहाळत होता.तस संगीन पदर नीट केला आल्की न बी तोंड
लपवला.
तात्या,''
काय संगे लई माजलीस काय आमच्या जीवाव्वर जग्तीस
आमच्या रानातला गवत इकायला न्हेतीस आन आम्हाला उपाशी ठेवून बाजाराला चाललीस व्ह्य ?''
तात्या ची अल्की
वरची नजर हाटत नाही हे पाहून संगी च उर जोरजोरात धडधडायला लागला.संगी ला ह्या
गिधाडाची वाईट नजर आणि सवयी माहित होती .
तशी परिस्थितीला
हाताळत संगी तात्याला लाड लाड म्हणाली ,'' मालक येव्हड्या बारीला जाउन द्या पोर उपाशी हायेत सकाळ धरन पोरांनी काही बी
नाय खाल्ला ,आम्ही गरिबान कधी
तुम्हासन नाय म्हटलं का ?''
तात्या,''
काय अल्के बरी हायेस का? भूख लागली व्हय चाल बस गाडीवर वडापाव चारतो. ''
तस संगी ने अल्की
चा हात जोरात पकडून जोरात पुढे चालायला लागली.
तात्या, '' अल्के शब्द
लक्षात ठेव'' आणि बुलेट चा वेग वाढवून तात्या अल्की कड बघत कुचक हसून जोरात निघून
गेला.
संगी न एक शिवी
हासडून पोरांवर ओरडली , '' चला र भरभर बाजार
संपल तिकड.''
संकट सावली सारखे
तिच्या माग माग बाजारात चालत होती. बाजारात पोहचत नाही तोच ठेकेदार समोर उभा. तीन
गाठोड्याचे हातावर १०० रुपये टेकवून मागची उधारी कापून घेतली. डोक्याला हात लावून आपल्या नशिबाला शिव्या देत तशीच सुन्न
होऊन बाजारात बसली.तिघांचा चेहरा हि रडवेला झालेला.सगळे डोळ्यातला पाणी लपवत
एकमेकाकड बघत होती. दुरून हे दृश्य
पाहणारी शांताई संगी ला धीर देत म्हणाली, ‘’ जाऊ दे संगे आपला नशीबच असा वंगाळ आहे
बघ आग तू काय आन इथ बसलेल्या सम्ज्द्या बाया काय आयुष्य भर ह्या वझ्याखाली दबणार
बघ.नको इचार करूस पोर उपाशी असत्याल. जा घराला त्यास्नी खायला घाल.’’
धीर एकवटून
पोरांना पोटाशी धरून संगी घराकड निघाली.जाता जाता थोडा तांदूळ डाळ मीठ मिरची आन
रॉकेल घेऊन घरी आली. सुभ्याला ला आज पण खिचडीच खावी लागणार होती पण डोळ्यासमोर
आपल्या आईचे दिसणारे रोज रोज चे हाल भूखेचा ज्वालामुखीला शमवत होते.रोज रोज असा हे
गुलाम सारखा जगण संगीला नको नकोस झाला होता.आपल्या आणि आपल्या पिलांची पोटाची खळगी
भरतांना खूप काही सहन कराव लागत होत.
संगी आन शालिनी
सारख्या कित्येक स्त्रिया आज हि अस्तित्वाच्या लढाई च्या ओझ्या खाली दबल्या
गेलेल्या आहेत.